शेती व शेतकरी व त्यांचे गंभीर होत जात असलेले प्रश्न—-सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील अग्रलेख वाचावा .

  1. एकीकडे शेतीची उत्पादनक्षमता वाढत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
  2. हा विरोधाभास नाही काय ?
  3. जे काही आंदोलन चालले आहे —-मध्य प्रदेशातील आंदोलन तर हिंसक बनत चालले आहे —त्या आंदोलनामागील मुख्य कारण / घटक म्हणजे —आर्थिक संकट–मार्केट failures [ किमती संदर्भात ] –सदोष सरकारी धोरण वगैरे
  4. वर वर पाहता आपणास असे दिसेल की  उत्तर प्रदेश सरकारने ३६००० कोटी रुपये इतकी कर्ज माफी दिली म्हणून इतर ठिकाणी तशी मागणी होत आहे. परंतु तसे नाही.
  5. बऱ्याच बाबतीत फसलेले धोरण देखील सध्याच्या अशांतीला कारणीभूत आहे.
  6. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी अस्वस्थ आहे याचे मुख्य कारण —चांगले पीक हातात येऊन देखील त्याचा फायदा झाला नाही कारण किमती पडल्या व त्याचे नुकसान झाले. उदाहरणार्थ तूर डाळीचे भाव ६३% खाली आले [ डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ]
  7. तसेच मार्केट मध्ये पुरवठा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे सरकारने आयात थांबवली नाही–तसेच निर्यातीस बंधने घातली .
  8. त्यातच नोटा बंदीमुळे खेडेगावात रोख रकमेची टंचाई झाली.
  9. शेतकरी कर्ज फेडू शकला नाही व त्याला त्यामुळे नवीन कर्ज मिळू शकत नाही. या सर्वातून कर्ज माफीची मागणी पुढे आली.
  10. पण कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. खरे प्रश्न वर उल्लेख केलेले –त्यावर कायम स्वरूपी उपाय शोधणे आवश्यक

via Farmers on the brink | Business Standard Editorials

Leave a Reply